Monday, August 9, 2010

डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव

डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव
इंगोले, दौंड, घोडेगावकर, यशवंत, अंत्रेंना विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीरराहाता,
५ ऑगस्ट/वार्ताहरसहकारी
साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणार आहे. अन्य साहित्य पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. शंकरराव दिघे यांनी दिली.पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्काराचे हे विसावे वर्ष आहे. यावर्षी लेखिका प्रतिमा इंगोले यांच्या आत्मघाताचे दशक या साहित्यकृतीस, लोकनाथ यशवंत यांच्या पुन्हा चाल करू या..! या काव्यसंग्रहास, जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कैलास दौंड (पाथर्डी) यांच्या कापूस काळ कादंबरीस, कला गौरव पुरस्कार वगनाटय़ लेखक नाथामास्तर घोडेगावकर यांना, तर विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार पत्रकार विकास अंत्रे यांच्या झेंडूची फुले या कथासंग्रहास देण्यात येणार आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.श्री. साळुंखे यांच्या देण्यात येणाऱ्या विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे ५१ हजार रूपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इंगोले यांना २५ हजार, यशवंत यांना १५ हजार, दौंड व घोडेगावकर यांना प्रत्येकी १० हजार व अंत्रे यांना ५ हजार, तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.श्री. साळुंखे यांनी केलेले चिंतन व ग्रंथलेखन हे महाराष्ट्राचे वैचारिक श्रेष्ठत्व सिद्ध करणारे आहे. सामाजिक परिवर्तनात बाधा बनलेल्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करीत त्यांनी निर्भिडपणे विविध ग्रंथांतून विचार मांडले आहेत. त्यांचे सर्व साहित्य महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा मार्गदर्शक ग्रंथ ठरले आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावे सामान्य माणसाचे होत असलेले शोषण त्यांनी साहित्यातून मांडले आहे.इंगोले यांनी विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत फिरून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भेट दिली. त्यांच्या समस्या व शेतकरी जीवन त्यांनी आत्महत्येचे दशक या साहित्यकृतीत मांडले आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. कापूस काळद्वारे दौंड यांनी एका पिकाभोवती शेतकऱ्यांचे जीवन कसे फिरते याचे चित्रण केले आहे.सर्वश्री. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. गोपाळराव मिरीकर, प्राचार्य विजयराव कसबेकर, प्रा. मेधा काळे, प्रा. शंकरराव दिघे (निमंत्रक) व डॉ. राजेंद्र सलालकर यांच्या निवड समितीने वरील पुरस्कारासाठी साहित्यकृतींचे परीक्षण केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'पद्मश्री विखे-पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार' जाहीर
साहित्य सृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा यावर्षीचा 'पद्मश्री विखे-पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २४ ऑगस्टला पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
डॉ. साळुंखे यांच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर आधारित असलेल्या 'आत्मघाताचे दशक' या प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यकृतीस व लोकनाथ यशवंत यांच्या 'पुन्हा चाल करू या...' या काव्यसंग्रहाला विखे-पाटील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पाथडीर्चे पत्रकार कैलास दौंड यांच्या 'कापूस काळ' कादंबरीला नगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, तर विकास अंत्रे यांच्या कथासंग्रहाला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत

1 comment:

Parag_86 said...

डॉ. आ. ह. साळुंखे सरांचा सर्व बहुजन समाजाला सार्थ अभिमान आहे ...........

बळीवंश आणि गुलामांचा आणि गुलाम करणार्यांचा धर्म एक नसतो च्या audio लिनक्स
बळीवंश......
http://rapidshare.com/files/414490005/Baliwansh_Prakashan_04.mp3

http://rapidshare.com/files/414490007/Baliwansh_Prakashan_03.mp3

http://rapidshare.com/files/414490020/Baliwansh_Prakashan_02.mp3

http://rapidshare.com/files/414490622/Baliwansh_Prakashan_01.mp3

गुलामांचा आणि गुलाम करणार्यांचा धर्म एक नसतो...

http://rapidshare.com/files/411338939/Gulamancha_Aani_Gulam_Karnaryancha_Dharma_Ek_Nasto_2.mp3

http://rapidshare.com/files/411336170/Gulamancha_Aani_Gulam_Karnaryancha_Dharma_Ek_Nasto_1.mp3